Monday, December 31, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली - १०

परत निमगावकर सर व्यासपिठावर आले....आणि म्हणाले....रोहित तू सांगितलेल्या गोष्टी मुलं नक्की लक्षात ठेवतील...तू सांगितलेलं अगदी खर आहे ....आजची पिढी हे सगळ विसरली आहे....त्यांच्यासाठी ह्या गोष्टी खरच खूप महत्वाच्या आहेत...असो....आता मुलांनो....तुमची टर्न.....आर्थात उत्स्फूर्त संवाद ......तुम्ही मोकळे आहात आता आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांना प्रश्न विचारायला...आणि हो..... नुसतं रोहित सरांनाच नाही तर नेहा ताईंना पण विचारा....पहिला प्रश्न कोण विचारणार आहे?  हम्म आकाश विचार..
आकाश जवळ एक मुलगा माईक घेवून गेला ... आकाश म्हणाला 
" माझा प्रश्न रोहित सरांसाठी आहे...सर, तुम्ही एवढा सगळ लिहित होता.....त्याबरोबर आयआयटी मध्ये अभ्यास कसा सांभाळत होता?.."
मी म्हणालो " आकाश ....तू प्रश्न चांगला विचारला आहेस...पण तुला मी सांगतो कि हे सगळ मी लिहित गेलो तो माझा छंद म्हणून....आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट छंद म्हणून करता तेव्हा ती तुमच्या आभ्यासाच्या कधीच मध्ये येत नाही....पण हा...जर तुम्ही अभ्यास नको म्हणून जर सारखी ती गोष्ट करायला लागलात तर मग आवघड आहे...तेव्हा तात्पर्य काय...कि छंदाला छंदच राहू द्या....त्याची सवय करू नका.......कळल ??"
"  हो सर....कळल ना...." आकाश म्हणाला...
बऱ्याच मुलांनी प्रश्न विचाराय्साठी हात वर केले होते.....मग केतकी उठली आणि तिने विचारल...
"माझा प्रश्न नेहा madam साठी आहे ,  madam, तुम्ही खरच प्रथम लोकलमध्ये भेटलात का सरांना ? आणि तेव्हाचे सर आणि आत्ताचे सर ह्यात काही फरक वाटतो का तुम्हाला?"
नेहानी माझ्याकडून माईक घेतला......आणि ती म्हणाली....
"नमस्कार मुलांनो....तुम्ही खरच सगळे खूप गोड आहात....खूप शांत पण आहात...आम्ही आमच्या शाळेत इतके कधीच शांत बसत नव्हतो....असो....केतकी......तू वाचलीयेस का गोष्ट लोकलमधली ?"
"हो  madam...."
बर...पण केतकी.....हि गोष्ट खारीये कि मी रोहित सरांना लोकलमधेच भेटले....पण तुला मी खर सांगते कि तेव्हा मला वाटलच नव्हत कि आपण हे सगळ काही जगतो आहो ते रोहित डोक्यात साठवतोय आणि ते तो लिहून काढणार आहे....त्यातल्या लेखकाला मी तेव्हा भेटलेच नव्हते.....अर्थात त्याने मला भेटवलच नव्हत...पण जेव्हा मी स्वतः ती गोष्ट वाचली.....तेव्हा माझं रोहित सरांवारच प्रेम ....त्यांच्या बद्दलचा माझा आदर आजून वाढला....आणि आजून एक.....त्यावेळेचे रोहित सर आणि आत्ताचे रोहित सर ह्यात फक्त एकच फरक आहे कि तेव्हा तो फक्त रोहित होता पण आता तो सौनिकपण आहे......"
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या....मग निमगावकर सर स्वतःच उठले आणि म्हणाले...
" पुढचा प्रश्न मी विचारणार आहे...रोहित आधार गोष्ट कशी सुचली तुला? 
"सर , आधार हि एक फार सुंदर गोष्ट आहे...मला माझ्या लिखाणातली सर्वात आवडलेली गोष्ट....पण ती मला सुचली एका बागेमध्ये...त्या बागेमध्ये एक फार रहीस कुटुंब आपली २-३ कुत्री, त्यांना सांभाळण्यासाठी  असलेले २ माणस आणि एक व्हील चेयर वर बसलेली मुलगी आणि तिला घेऊन जाणारी बाई असे सगळे घेऊन फिरायला येत असत...." रोज ते तिथे येयचे...रोज ती व्हील चेयर वरची मुलगी त्या बागेतल्या फुलांकडे...फुलपाखरांकडे बघून मनसोक्त हसायची...तिथे खेळणाऱ्या मुलांकडे पाहून स्वतःला आनंदित करून घेयची....पण ती कधीच त्या चेयर मधून उठत नसे....एकदा मी त्या बाईला विचारल....म्हणल.....
"कहो बाई....हि मुलगी रोज इथे येते....हसते ....मुलांकडे पाहून आनंदित होते...पण कधीच स्वतः त्यांच्यात जात नाही....तेव्हा ती बाई म्हणाली...."सर , तिचा एक पाय नाहीये....ती उभी राहू शकत नाही.....आधी ती खूप खेळत असे.....बागडत असे...पण आता नाही..."
ते ऐकून क्षणभर डोळे पाणावले.....आधारच महत्व मला तेव्हा कळल...आणि त्यातूनच आधार गोष्टीचा जन्म झाला...."
 



No comments:

Post a Comment