Sunday, January 6, 2013

पुन्हा गोष्ट लोकलमधली - १२

डिसेंबर महिना चालू होता...आम्ही नुकतच त्या स्नेह्संमेलनाला जाऊन आलो होतो....मी आणि नेहा नेहमीप्रमाणे ऑफिसहून परत आलो होतो...आईने आमच्यासाठी मस्त चहा केला होता.... तो देत ती म्हणाली...
"रोहित...आज काय,  कसं झाल ऑफिस ?
मस्त झाल आई....आग आई....आज कोणाचा फोन आला होता माहितीये?
 कोणाचा रे ?
अग आशिष ....आम्ही त्याला जाड्या म्हणायचो .... नाही का .तो माझ्याबरोबर होता ...
हो  हो... काय म्हणतोय तो..? काय करतो सध्या...
काही नाही ग.... बंगलोरला असतो...नौकरी करतो
बर ....अरे वा....मग लग्न कुठे आहे....? बंगलोरला?
नाही....जयपूरला .....आपल्या सगळ्यांना बोलावलंय...
काय जयपूर? एकदम जयपूर कस?
मुलगी जयपूरची आहे...
नेहा म्हणाली.... love marriage  असेल....आई...त्याच....
नाही....नाही....arrange आहे
 बर बर....कधी आहे लग्न...?
३० डिसेंबरला आहे....आपल्याला जायचय....
हो आपण ह्यावेळी....आई बाबांना पण घेऊन जाऊ.... नेहा म्हणाली...
हो ते तर आहेच.....आई तु तयारीला लाग....बाबांना पण सांग...
अरे पण.....आम्ही कशाला....
नाही तुम्ही येणार आहात....." अस म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी पेयला गेलो...तोच मला ह्या दोघींच्या गप्पा ऐकू येवू लागल्या....
" आई , जयपूरला साड्या खूप छान मिळतात , चपला पण खूप छान मिळतात ,  लग्न तर फक्त कारण आहे....आपण मस्त शॉपिंग करू तिथे.....
नेहा अगदी मनातल बोललीस बघ...आम्ही गेलो होतो रोहित लहान असताना जयपूरला पण तेव्हा तो नेमका तिथे आजारीच पडला....आणि आमच सगळ शॉपिंग राहील होत....पण,  हो रोहित एकटा गेला होता तेव्हा त्यानी माझ्यासाठी खूप सुंदर साडी आणली होती....खरच....आपण खूप शॉपिंग करू....तिथे "
मी पाणी पीत पीत विचार करू लागलो ....काय हे जाड्यानी ठेवून ठेवून लग्न जयपूरलाच का ठेवलाय..?


1 comment:

  1. saurabh jaipur la kontya hotel la.. tumhi jithe thambala hota tithech ka??

    ReplyDelete