Saturday, August 13, 2011

गोष्ट लोकलमधली-२३

दिवस कसले पटापट जात होते...मला माझ्या projectchya कामासाठी IISc,Banglore ला जायचं असं नुकतच कळल होत..त्यानुसार मी tickits काढले. मी आजून नेहाला काहीच सांगितलं नव्हत. तिला माहीतच नव्हत की मी banglore ला जाणारे......त्यादिवशी आम्ही नेहमीप्रमाणे ट्रेन मध्ये भेटलो....तिने आज माझ्यासाठी प्रथमच गुलाब जाम बनवून आणले होते...ती म्हणाली,
" आज न मी तुझ्यासाठी काहीतरी आणलय...?
 "  हो..? हल्ली माझी फारच सेवा चाललीये ?? काय काही हवाय का?."..मी म्हणल
   जा बाबा , तुला न काही कौतुकाच नाहीये केल्याच....
   किती छान चिडतेस न तू सोना.....अग मी गम्मत करतोय गं....बोल काय आणलयेस
   ए मी ना तुझ्यासाठी गुलाब जाम आणलेत..मी स्वतः केलेयेत..
   हो का ...अरे वा ....ते खायचे पण आहेत का..???
   जा रे आता मी ना बोलणारच नाहीये तुझ्याशी....तुला ना बोलून काही उपयोगच नाहीये...
   okokok baba.....sorry...." असं म्हणून मी त्यातला एक गुलाब जाम उचलला....
  " वां काय मस्त झालेत....खरच खूप मस्त.... 
    नेहानी हळूच माझ्याकडे पाहिलं....तिच्या नाकावरचा राग तिला नको वाटत होता तरी केव्हाच उडून गेला होता.... ह्या सगळ्या उद्योगात परत मी नेहाला सांगायचं विसरलो की मी उद्या बंगलोर ला जाणार आहे ते.....आम्ही उतरलो ती तिच्या ऑफिस मध्ये गेली..मी IIT  मध्ये गेलो...
     दुसऱ्या दिवशी मी ट्रेन मध्ये बसलो...अजूनही मी नेहाला काहीच सांगितलं नव्हत.....ट्रेन सुटली.....ठाणे cross केल....नेहाचा फोन आला...
   हेलो , आज संध्याकाळी movieला जायचंय...मी tickits काढलेत....संध्याकाळी ७ चा शो आहे...आपण ६ ला स्टेशन वर भेटू....घाटकोपरच tickit मिळालय...ok bye.." असं म्हणून तिने फोन चक्क ठेवून दिला...
मी तिला परत call  केला...." हेलो नेहा, जरा ऐक , मी ट्रेन मध्ये आहे...बंग्लोरेला चाललोय...३ दिवसांनी परत  येणारे...so मला नाही गं येता येणार..हेलो हेलो??? नेहा??
तिने फोन केव्हाच कट केला होता......तिला माझा प्रचंड राग आला होता...एक तर मी तिला न सांगता ३ दिवसांसाठी बाहेर चाललो होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची tickits वाया जाणार होती...
मी तिला परत फोन केला
" नेहा जरा ऐक माझ...मी चुकून विसरलो तुला सांगायचं...आग काल खुपच गडबड झाली college मध्ये....घाईघाईत विसरलो गं...sorry  म्हणतोय न....."
"तेवढ्यात  seat no 86 येही है ना ?? असा एक बारीक आवाज आला .....मी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं....एक सुंदर तरुणी माझ्या शेजारी बसायला आली होती.....मी चुकून फोन कट केला आणि म्हणाल..
yeah....please have a seat...नेहाचा आता स्वतःहूनच फोन आला ...
"हेलो, आग चुकून कट झाला फोन....
तुझ्याबरोबर कोण आहे .....?
कोणी नाही...तेवढ्यात ती मुलगी म्हणाली....
hi, my name is shreya....
श्रेया ?? कोण श्रेया? समीर हे सगळ काय चाललंय...कोणाबरोबर चाललायेस  तू...???
आग सोना, ती मुलगी आता चढली आहे गाडीत, माझ्या शेजारच्या सीट वर आहे ...मग आता ती बोलल्यावर तर मला उत्तर द्याव लागेल ना...
ok ...पण फार उत्तर देवू नकोस नाहीतर ती प्रश्न विचारतच राहील....
मला खरच खूप हसू येत होत...मी म्हणल बर ठीक आहे मी नाही जास्त बोलणार...खुश?
बर, ३ दिवस काय काम आहे तुझ तिकडे...?? लवकर ये....
बर बघतो....आता ठेवू का??
का ती श्रेया बोलावतिये का??
काये नेहा?? तू पण ना जास्तच कर्तीयेस आता
हो आता मीच जास्त करतीये आणि तू केलस ते...ते फार कमी होत नाही....?? असं म्हणून तिने फोन ठेवला...
      त्या दिवशी मला कळल की शक्यतो प्रेमात पडलेल्या मुलाच्या शेजारच्या सीट वर कधी सुंदर मुलगी येवू नये आणि जर आलीच तर तेव्हाच त्याच्या girlfriendचा फोन येयू नये.....कारण जर एकदाका तो फोन आला की तो फोन पूर्ण प्रवासभर येत राहतो....जस माझ्या प्रवासात झाल....

2 comments:

  1. saurabh ata hi goshta thambav. navin kahi suchat asel tar lihi pan hi goshta nako..ugichach kahipan chalu ahe he...

    ReplyDelete
  2. asa saglyana vatal ki mi band karen...!! but anyway thanx....!!!

    ReplyDelete