Tuesday, October 22, 2013

आनंदाश्रम.....२

"बाबाकाका बाबाकाका ......हे बघ मी चित्र काढलाय.....इशा धावत माझ्याकडे आली...
अरे वा बघू तरी आमच्या ईशाने काय काढलय ते....
मी ते चित्र हातात घेतलं.....त्याकडे हलक्या नजरेनी पाहिलं.....माझे डोळे थक्क झाले.....तिने स्वतःचच चित्र काढल होत...... पण त्याबरोबरच तिने आनंदाश्रमातील  दोन झाडं काढली होती......एका झाडावर लिहिल होतं ...'आई' आणि एका झाडावर लिहिल होतं 'बाबा'..... दोन सेकंद डोळ्यातले आश्रू अनावर झाले.....सई तेवढ्यात म्हणाली....बघू मला पण बघू दे!

तिने माझ्या हातातून ते चित्र घेतलं.....मी दोन मिनिट ईशाकडे पाहिलं.....तिला घट्ट मिठी मारली....आणि म्हणालो.....धन्य आहेस बाळ तू.....

"बाबाकाका एक विचारू..?
हो विचार कि....
बच्चू म्हणजे काय रे?
काय? बच्चू? अम्म्म्म....बच्चू म्हणजे लहान मुलगा अगर लहान मुलगी....
म्हणजे माझ्यासारखी?
हो अगदी तुझ्यासारखी, गोंडस, हुशार आणि थोडी खोडकर सुद्धा....
पण दुनियादारी सिनेमात तर ती शिरीन त्या श्रेयसला बच्चू कशी म्हणते मग...?
तू कधी पाहिलास दुनियादारी इशा?
अरे तुझ्याच tab मध्ये पाहिला काल....तू दिलेलास ना मला गेम खेळायला तेव्हा...पण तू ते सोड.....सांग ना मला.....ती बच्चू कशीकाय म्हणते?
आग राणी....जर तुझ्या जवळच , अत्यंत लाडक कोणी असेल ना तर त्याला लाडानी पण बच्चूच म्हणतात.....
हो? मग आईकाकू पण तुला बच्चू म्हणते?

तिचा पुढचा प्रश्न तयार होता .....ते ऐकून मी जरासा बिचकलोच .....काय अफाट हि बुद्धी , तल्लखपणा,

सांग ना बाबाकाका ....बरोबर आहे ना?

हो एकदम बरोबर आहे....मी मनात म्हणल.....आज कालची पिढी म्हणजे तुफान आहे.....
 
"आईकाकू, तू तर कधीच म्हणल नाहीस बाबाकाकाला बच्चू माझ्यासमोर... ?"

चला इशा....आता आपली आवरायची वेळ झाली.....बाहेर जायचय  ना......मग आवर पटकन....
हो कि नाही रे बच्चू....

सईने मला बच्चू म्हणल आणि त्या निरागस चेहऱ्यावर जी काही हास्याची चमक आली.....हिऱ्याची लकाकीही फिकीच त्यासमोर

हो हो....अर्थात...चला पटकन आवरा ....

कुठे जायचं आहे पण आपल्याला आईकाकू?

आग आनंदाश्रम

आनंदाश्रम....yesssss........hurrey....म्हणजे आज मी आई बाबांना भेटणार.....अस म्हणून इशा तयारीला गेली....

अरे हो....आनंदाश्रम.....तुमची ओळख करून देतो....

आनंदाश्रम म्हणजे  जिथे खुद्द आनंद आश्रयासाठी येतो....जिथे माणूस नात्यांसाठी नाही तर नाती माणसासाठी पायघड्या घालतात.....जिथे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण ह्याचं मिश्रण होऊन एक नवीन वय तयार होत.....हो तोच...आनंदाश्रम......माझ्या आईबाबांचं स्वप्न.......माझा वर्तमान......आणि हो इशासारख्या असंख्य लोकांचा "आनंद्काळ.."


  

Thursday, October 17, 2013

आनंदाश्रम.....

संध्याकाळ झाली होती....मी चहा पीत बाल्कनीत बसलो होतो.....सूर्याच आसपास कुठेही नामोनिशाण दिसत नव्हत....आकाश जणू काही काळ्याभोर ढगांनी पुरत व्यापुन टाकल होत..मधेच विजांचा गडगडाट तर मधेच पक्ष्यांचा किवकीवाट कानी पडत होता....हे वातावरण जणू कोणीतरी कुठेतरी खूप दुःखी आहे तर कुणीतरी कुठेतरी चिंब भिजण्यासाठी उत्सुक आहे अशी प्रचीती करून देत नेहमी मला ....मी चहाच्या प्रत्येक घोटागणीक त्या वातावरणाशी एकरूप होत चाललो होतो....

"चहा कसा झालाय?", साखर पडलीये ना बरोबर?, माझ्याहातून कमी पडते म्हणून विचारलं....

मी मागे वळून पाहिलं.....नेहमीप्रमाणे काहीच न बोलता.....सईच सगळ बोलण मला ऐकू आल होत...तिचे डोळे बोलतातच मुळी इतक्या जोरात .....

"चांगला झालाय चहा"

" पाऊस येणारे खूप जोरात....मी सगळे कपडे आत घेते नाहीतर उगाच ओले होतील....तू आज कसाकाय एवढा निवांत...."

अरे हा पाउंस का येत नाहीये....पटकन येवून कोसळून जाऊ दे....कुणाच मन किती हलक होईल....त्याच दुःखं ह्या सारीन्बरोबर वाहून निघून जाईल.....तर कोणीतरी त्यात चिंब होऊन तृप्त होईल....

पण पाउस येतच नाहीये...

सगळ नेहमी इतका सोप नसत....श्रेयस....

म्हणजे

काही नाही.....

आज ईशाच्या पोलिओ डोस ची तारीख आहे....तिला नेयच आहे.बूथ वर ....पाउस येयील तेव्हा येयील.....आपल्याला निघायला हवय....

मोरे काका सकाळीच गेलेत....आश्रमात......जोशी आजींना अस्वस्थ वाटत होत....डॉक्टरांना घेऊन गेलेत.....
तिथेपण जाव लागेल आपल्याला ...चल पटकन आवर.....

सई......खरच .....लहानपण आणि म्हातारपण किती सारख आहे हे कस लोकांना कळत नाही...काही लोक लहानपाणी लोक सोडून जातात तर काही लोक म्हातारपणी लोक सोडून जातात....आज मला कळतंय....देवाने दोन वेळा आपल्याला बालपण जगायचा chance दिलाय......लोकांना हे जेव्हा कळेल ना तेव्हा बघ आपल्या सारख्या लोकांची गरजच उरणार नाही....

तेवढ्यात बेल वाजली....सईने दार उघडल....

" श्रेयस बघ कोण आलय........  

Wednesday, July 10, 2013

गझल.....

उजाडलेल्या सूर्याची किरणे शोषत होतो..
रात्रीची चाहूल घेऊन आलीस तू तेव्हा...

मनातल्या मनात चार शब्द जुळवत होतो...
गीत बनून ओठी आलीस तू तेव्हा...

गुंतलेल्या धाग्याची उकल शोधत होतो
गाठ बनून हाती लागलीस तू तेव्हा....

गुरफटलेल्या आयुष्यात राम शोधत होतो
सीता बनून तू भेटलीस मला तेव्हा

स्वतः मधले स्वत्व आरशात पाहत होतो...
सावली म्हणून तू दिसलीस कशी तेव्हा ?

गंधाळलेल्या फुलांमध्ये, सौरभ शोधत होतो
सरींसवे मातीत विरून , गंधाळलीस ग तेव्हा

रमलो होतो मिठीत कवितेच्या ग राणी
ओठ तुझे गाली स्पर्शून गेलीस ग तेव्हा


                                                               सौनिक

Sunday, July 7, 2013

काळ

काळ ....सरत जाणारा.....
आयुष्यात रुतत जाणारा...
क्षणांशी स्पर्धा करणारा ....काळ

पक्ष्यांसवे  सरकन उडणारा...
सरींसवे  चिंब भिजणारा
अनोळखी वाटेवरती हात हाती देणारा ....काळ

क्षितीजापारी अथांग असणारा...
समुद्रापरी निवांत असणारा
वाऱ्याच्या प्रत्येक लाटेवरती वाहणारा ......काळ

डोळ्यातली सारी स्वप्नं जाणणारा
 घडणारी हर गोष्ट पाहणारा...
जीवनातली प्रत्येक वेळ  जगणारा.....काळ.

काळ.....नेहमी वेळेबरोबर राहणारा...
घड्याळाबरोबर घडणारा
नकोतीथे...नको त्यावेळी बदलणारा.....काळ.....

                                                                       
                                                                         -  सौनिक
                                                                   

Monday, June 3, 2013

तू रे....

तू रे.....
मनातले हे भाव तू रे...
डोळ्यातले ते गाव तू रे ....
अनोळखीसे नाव तू रे....
तू सखा अन तूच तू रे...

ओठातले ते गीत तू रे
स्पर्शातले ते स्मित तू रे
गाजलेली रीत तू रे....
तू सखा तूच तू रे.....

दाटलेले मेघ तू रे
वाटलेले प्रेम तू रे
गुंतलेले श्वास तू रे.....
तू सखा तूच तू रे....

कल्पनांची वाट तू रे
भावनांची गाठ तू रे...
पेटलेली वात तू रे....
तू सखा अन तूच तू रे.....


आज तू अन काल तू रे
अनंत तू नि अंत तू रे....
दान तू वरदान तू रे
तू सखा अन ईश तू रे.....
तू सखा अन तूच तू रे.....

                                          - सौनिक ....

Thursday, February 7, 2013

सांजवेळा.....


मनाशी बोलणाऱ्या.....स्वतःला  मांडणाऱ्या
एकट्याला एकट्याशी बांधणाऱ्या...........सांजवेळा


ह्या जीवांना आस असते भेटण्याची
अंतरीचे भाव सारे सांगण्याची

ह्या मनाला त्या मनाशी जोडणाऱ्या ......सांजवेळा


दाटलेले दुःख येते मग भरून
मन असते हात-हाती अन धरून

अश्रूंनाही हासवून सांडणाऱ्या..........सांजवेळा


विसकटलेल्या भावनांना सावरून
मन म्हणते बघ जरा निरखून

तुझे निरोप तिलाही सांगणाऱ्या .....सांजवेळा....

Sunday, January 6, 2013

पुन्हा गोष्ट लोकलमधली - १२

डिसेंबर महिना चालू होता...आम्ही नुकतच त्या स्नेह्संमेलनाला जाऊन आलो होतो....मी आणि नेहा नेहमीप्रमाणे ऑफिसहून परत आलो होतो...आईने आमच्यासाठी मस्त चहा केला होता.... तो देत ती म्हणाली...
"रोहित...आज काय,  कसं झाल ऑफिस ?
मस्त झाल आई....आग आई....आज कोणाचा फोन आला होता माहितीये?
 कोणाचा रे ?
अग आशिष ....आम्ही त्याला जाड्या म्हणायचो .... नाही का .तो माझ्याबरोबर होता ...
हो  हो... काय म्हणतोय तो..? काय करतो सध्या...
काही नाही ग.... बंगलोरला असतो...नौकरी करतो
बर ....अरे वा....मग लग्न कुठे आहे....? बंगलोरला?
नाही....जयपूरला .....आपल्या सगळ्यांना बोलावलंय...
काय जयपूर? एकदम जयपूर कस?
मुलगी जयपूरची आहे...
नेहा म्हणाली.... love marriage  असेल....आई...त्याच....
नाही....नाही....arrange आहे
 बर बर....कधी आहे लग्न...?
३० डिसेंबरला आहे....आपल्याला जायचय....
हो आपण ह्यावेळी....आई बाबांना पण घेऊन जाऊ.... नेहा म्हणाली...
हो ते तर आहेच.....आई तु तयारीला लाग....बाबांना पण सांग...
अरे पण.....आम्ही कशाला....
नाही तुम्ही येणार आहात....." अस म्हणून मी स्वयंपाकघरात पाणी पेयला गेलो...तोच मला ह्या दोघींच्या गप्पा ऐकू येवू लागल्या....
" आई , जयपूरला साड्या खूप छान मिळतात , चपला पण खूप छान मिळतात ,  लग्न तर फक्त कारण आहे....आपण मस्त शॉपिंग करू तिथे.....
नेहा अगदी मनातल बोललीस बघ...आम्ही गेलो होतो रोहित लहान असताना जयपूरला पण तेव्हा तो नेमका तिथे आजारीच पडला....आणि आमच सगळ शॉपिंग राहील होत....पण,  हो रोहित एकटा गेला होता तेव्हा त्यानी माझ्यासाठी खूप सुंदर साडी आणली होती....खरच....आपण खूप शॉपिंग करू....तिथे "
मी पाणी पीत पीत विचार करू लागलो ....काय हे जाड्यानी ठेवून ठेवून लग्न जयपूरलाच का ठेवलाय..?


Thursday, January 3, 2013

पुन्हा गोष्ट लोकलमधली - ११

मग एक मुलगी उठली.....माईक हातात घेतला आणि म्हणाली...
"माझा प्रश्न रोहित सर आणि नेहा  madam  दोघांसाठी आहे......सर तुम्ही नेहा nadam च जे वर्णन करता गोष्टींमध्ये.....ते खरच खूप छान असत.....तुम्हाला नेहा  madam मधली  सगळ्यात नावडती गोष्ट कोणती आहे.... आणि  madam  तुम्हाला सरांची  सगळ्यात कोणती गोष्ट आवडते....?"
" बाळ, तुझ नाव काय?...खरच खूप मस्त प्रश्न विचारला आहेस"....नेहा म्हणाली....
 " माझं नाव जिगीषा कुरुंदकर ....."
 " जिगीषा पहिला प्रश्न सरांसाठी आहे तर पहिल्यांदी तेच उत्तर देतील अस म्हणून नेहानी माझ्याकडे माईक दिला....मला मात्र चांगल कोड्यात टाकल होत त्या प्रश्नानी....मी म्हणल....
"जिगीषा....आवडती गोष्ट सांगू का? खूप आहेत.....नावडत्या नाहीच आहेत.....असो....पण एक गोष्ट आहे कि जी मला आजीबात आवडत नाही नेहा मधली ती म्हणजे.....तीच माझ्यावर असणार प्रेम कि जे माझं तिच्यावर असणाऱ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे....तिचा माझ्यावर असणारा विश्वास हा माझा तिच्यावर असणाऱ्या विश्वासापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे......तिला हे सगळ सहज जमत.....आणि ते मला आवडत नाही.....कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे....पण हे सगळ मला लिहून दाखवाव लागल लोकांना पण ती तिच्या वागण्यातूनच लोकांना दाखवून देते.... मला वाटत तुला मिळाल असेल उत्तर आता "
"हो सर.....आता madam तुमचं उत्तर "
"जिगीषा....माझी आवडती गोष्ट .... रोहितमधली....ती म्हणजे.....त्याचा साधेपणा.....आणि हो सगळ्यात महत्वाच म्हणजे....."नेहा".....कारण.....रोहित नेहाशिवाय अपूर्ण आहे आणे नेहा रोहितशिवाय....".
 पुन्हा टाळ्या कडाडल्या.......परत माईक शेगावकर सरांकडे आला....
"हा आता शेवटचा प्रश्न कोण विचारणार आहे....
"सर मी सर मी".....अस म्हणून एक मुलगा पुढे आला....
"माझा प्रश्न रोहित सरांसाठी आहे ....सर सौनिक म्हणजे काय?"
"सौनिक...मुलांनो....मी फक्त आता तुम्हाला एवढंच सांगू शकेन....कि लहानपणापासून...आपल्या मनात असंख्य गोष्टी घडत असतात ......पण त्या प्रत्यक्षात घडतातच अस नाही......त्या सगळ्या अप्रत्यक्ष मनातल्या गोष्टी म्हणजे...."सौनिक".....असच तुमचं प्रेम.....माझ्यावर राहू द्या...भरपूर वाचा.....हसा, खेळा हो पण तेवढाच अभ्यासही करा....Wish you all the best for your future.... धन्यवाद "