Tuesday, August 14, 2012

पुन्हा गोष्ट लोकलमधली.....२

तेवढ्यात माझा फोन वाजला...एकदम दचकलो ....पाहिलं तर सुरेशचा फोन होता......माझा ऑफिसचा कलीग ....मी फोन उचलला 
" हेलो, काय रे सुरेश?
 समीर आहेस कुठे?  केव्हाचा फोन करतोये?  उचलत का नाहीयेस?  काय आहेस कुठे? 
 अरे काही नाही.....सोड बोल न....काय काम आहे?
अरे , काय समीर विसरलास न?...आज आपल्याला इथल्या clientला पार्टीला नेयचं होतं न.....मीटिंग नंतर नाही का आपण बोललो होतो.....तू आहेस कुठे?
मी आता चर्चगेटला आहे.....अरे यार मी जाम विसरलो.....बर कुठे जायचय आपल्याला, सांग मला, मी येतो तिथे.. 
अरे आता तूच तिथे थांब. आम्हीच येतो तिकडे. मग सम्राटलाच जाऊ जेवायला.
बर, अरे पण त्याला आवडेल का सम्राट ?
अबे खाईल न.....तसही त्याला काय कळतंय पंजाबी आणि थाळीतला फरक...."
बर या मग...मी इथेच थांबतो..." असं म्हणून मी फोन ठेवून दिला....डोक्यातल विचारांच चक्र मात्र तसच चालू होत....असं वाटत होतं की, सतत कोणीतरी माझ्याबरोबर हात धरून चाललंय .......किंबहुना ह्या जागेला मला एकट्याला असं इथे चालताना  पहायची सवय नव्हती म्हणून असेल कदाचित.....पण  असो घडणाऱ्या गोष्टींना फक्त पहात राहण्यापलीकडे तेव्हा माझ्या हातात काहीही नव्हत.....लोक नेहमी म्हणतात प्रत्येक मुंबईकराच स्पिरीट खरच अफाट आहे.....पण प्रतेय्क मुंबईकराची सल्ण्याची क्षमताही अफाट आहे ह्याचा प्रत्यत त्या दिवशी मला  marin driveवर मिळाला.....

No comments:

Post a Comment